पोस्ट्स

About us

उन्हाळ्यात किडनी स्टोनचा वाढता धोका; वेळेवर तपासणी अत्यावश्यक - डॉ. श्याम तलरेजा यांचा इशारा

इमेज
नाशिक :- उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊन किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील युरोलॉजिस्ट डॉ.श्याम तलरेजा यांनी दिला आहे.अनेकदा किडनी स्टोनची समस्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे न दर्शवता विकसित होत असल्याने वेळेवर तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.डॉ. तलरेजा यांनी सांगितले की,उष्ण हवामानामुळे शरीरातून घामाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडते.परिणामी मूत्राचे प्रमाण कमी होते आणि खनिजे साचून किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते.सुरुवातीला कोणताही त्रास जाणवत नसला तरी पुढील टप्प्यात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ,मळमळ, उलट्या किंवा लघवीत रक्त दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी किडनीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनच्या निदानासाठी विशेष चेक-अप पॅकेज उपलब्ध असून,त्यामध्ये युरोलॉजिस्ट सल्लामसलत,सोनोग्राफी (USG), युरिक ऍसिड तपासणी तसेच किडनीसंबंधित रक्त तपासण्या समाविष्ट आहेत. ...

मंत्रालयात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

इमेज
अनुसूचित जाती-जमाती अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे मंत्रालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन मुंबई, दि.१३ : अनुसूचित जाती जमाती वि. जा/ भज/ई.मा.व/वि.मा.प्र/ शासकीय- निमशासकीय/ अधिकारी कर्मचारी संघटना मंत्रालय, मुंबई यांच्या विद्यमाने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य सचिव अग्रवाल तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. शासनाच्या योजना वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेने सतत प्रयत्नशील रहावे,असे आवाहन मान्यवरांनी केले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांनी प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे आणि सचिव विजय वाघमारे यांचे संघटनेच्या वतीने स्वागत केले. संघटनेमार्फत 135 व्या जयंतीनिमित्त 1,35,000 संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमास प्...

नाशिक ते मध्य प्रदेश असा रंगणार जलप्रवास; मुख्यमंत्र्यांनी केली 'या' मोठ्या उपक्रमाची घोषणा!

इमेज
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त आयोजन मुंबई,दि.१३ :-“गोदा ते नर्मदा” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य,विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी २५ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. गोदा ते नर्मदा या जलयात्रेबाबत मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा,जलसंपदा लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे,जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींची जन्मभूमी चोंडी महाराष्ट्रात असून त्यांचा प्रभावी सांस्कृतिक वारस...

अण्णासाहेब आर्थिक मागास महामंडळाचा‘व्यवसाय वर्धन मार्केटिंग टॅब’ ‍फ्लिपकार्ट,ॲमेझॉन आणि इंडिया मार्ट यांच्या धर्तीवर तयार

इमेज
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम वेगात लघुउद्योजकांना ‘लोकल ते ग्लोबल’ची दिशा मुंबई, दि. १३ :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.या उद्देशाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम, मार्केटिंग टॅब सारख्या आधुनिक सुविधा आणि कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक सुधारणा राबवून व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ दिले जात आहे.या उपक्रमांद्वारे लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे,तर ज्ञान,कौशल्ये आणि बाजारपेठेची जोड देऊन त्यांना सक्षम उद्योजक बनविण्याचा प्रयत्न महामंडळाद्वारे करण्यात येत आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे. डिजिटल बाजारपेठेची दारे उघडली महामंडळाने आपल्या अधिकृत पोर्टलवर ‘व्यवसाय वर्धन मार्केटिंग टॅब’विकसित केला असून तो ‍फ्लिपकार्ट,ॲमेझॉन आणि इंडिया मार्ट यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे.या प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची ...

"फाटलेला कोट घातलेल्या त्या मुलाने करोडपती माणसाला काय धडा दिला? नक्की वाचा!"

इमेज
"किंमत फाटलेल्या कोटाची नाही,तर काळजाची असते!" एक खूप मोठे उद्योगपती आपल्या आलिशान कारमधून जात होते.अचानक एका सिग्नलवर एक १०-१२ वर्षांचा मुलगा त्यांच्या कारची काच ठोठावू लागला.त्याच्या अंगावर एक फाटलेला जुना कोट होता आणि डोळ्यांत एक वेगळीच चमक होती.त्या उद्योगपतीने काच खाली केली आणि रागाने विचारले,"काय हवंय तुला? पैसे हवेत?"तो मुलगा हसून म्हणाला,"नाही साहेब,मला पैसे नकोत.मी फुलं विकतोय.आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि मला तिला एक छोटी भेट घ्यायची आहे. तुम्ही ही फुलं विकत घेतली तर मला खूप मदत होईल."त्या माणसाला मुलाचे बोलणे ऐकून नवल वाटले.त्याने विचारले,"तुझा कोट तर फाटलेला आहे,तू आधी स्वतःसाठी नवीन कपडे का घेत नाहीस?" मुलाने दिलेले उत्तर त्या श्रीमंत माणसाच्या काळजाला स्पर्श करून गेले.मुलगा म्हणाला, "साहेब,कपडे फाटलेले असले तरी चालतात,पण माणसाचं मन फाटलेलं नसावं.माझा कोट बाहेरून फाटलाय,पण आतून माझी स्वप्नं शाबूत आहेत!"त्या उद्योगपतीने सर्व फुलं विकत घेतली आणि मुलाला ५०० रुपये जास्तीचे देऊ केले.पण त्या मुलाने ते जास्तीचे पैसे घ...

"आरशात दिसलं असं काही की अंगावर काटा येईल!"

इमेज
"ती तिसरी व्यक्ती कोण?" भाग १: मध्यरात्रीचा तो फोन रात्रीचे ठीक १२ वाजले होते. सयाजीराव आपल्या आलिशान बंगल्यात एकटेच फाईल्स तपासत बसले होते. अचानक त्यांचा फोन खणखणला. अनोळखी नंबर होता. फोन उचलला तर पलीकडून फक्त श्वासांचा आवाज येत होता. "कोण आहे?" सयाजीरावांनी विचारलं. पलीकडून एक करड्या आवाजात उत्तर आलं, "सयाजीराव, आजची रात्र तुमची शेवटची रात्र आहे. बरोबर २ वाजता काळोख येईल आणि खेळ संपेल!" भाग २: बंद दारे आणि सावली सयाजीरावांनी तातडीने सुरक्षा रक्षकाला आवाज दिला, पण बाहेरून काहीच उत्तर आलं नाही. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला, तर धक्काच बसला! कॅमेऱ्याच्या लेन्सवर कोणीतरी काळं कापड बांधलं होतं. घराचे सर्व दरवाजे आतून लॉक होते, खिडक्या बंद होत्या. मग हा धमकी देणारा माणूस आत आला कसा? अचानक घराचा वीजपुरवठा खंडित झाला. संपूर्ण बंगल्यात भयाण शांतता पसरली. भाग ३: आरशातलं रहस्य सयाजीरावांनी हातात मेणबत्ती घेतली. ते हॉलमधील मोठ्या आरशासमोरून जात असताना त्यांना आरशात स्वतःच्या मागे एक तिसरी सावली दिसली. त्यांनी मागे वळून पाहिलं, तर तिथे कोणीच नव्हतं! ...

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा ज्योतिराव फुले - विशेष लेख

इमेज
भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता,शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो.११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे. समाजातील समता, शिक्षण,स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे. मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार महात्मा फुले यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू ...