वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. ‘मित्रा’ आणि ‘अर्थ डे नेटवर्क’मध्ये ५६ लाख झाडांचा करार!
मुंबई दि.१८:- महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक सल्लागार संस्था असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ‘मित्रा’ (MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यामध्ये पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारांतर्गत ५६ लाख वृक्ष रोपणासह विविध उपक्रम राबवून राज्यातील हवामान कृतीला (Climate Action) गती देण्यात येणार आहे. जागतिक वसुंधरा दिन २०२६ च्या निमित्ताने करण्यात आलेला हा सामंजस्य करार शाश्वत विकासाची चौकट मजबूत करण्यासाठी तसेच नागरिक, संस्था आणि उद्योगांना हरित भविष्यासाठी एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या भागीदारीत ‘मित्रा’ संस्थेकडून धोरणात्मक मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ दिले जाणार असून, अर्थ डे नेटवर्क इंडिया ही संस्था प्रत्यक्ष अंमलबजावणी, जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. या सहकार्याअंतर्गत महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार मिशन लाईफ : नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी राज्यव्यापी आराखडा सरकारी ऊर्जा ऑडिट चॅलेंज: ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि ...