पोस्ट्स

About us

नाशिक मधील सिद्धेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न

इमेज
नाशिक :-जुने नाशिक येथील श्री स्वयंभू सिद्धेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.​या मंगलप्रसंगी महारष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली. उपस्थित सर्व भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भगवान महादेवांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. जुने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवचैतन्य देणारा हा सोहळा भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ​या सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.देवयानी फरांदे आमदार विक्रांत पाटील भारतीय जनता पक्ष शहराध्यक्ष सुनील केदार,गटनेते शाम बडोदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार,नगरसेवक चंद्रकांत खोडे,नगरसेविका स्वाती भामरे,नगरसेविका रुपाली निकुळे,सचिन मराठे,मंगला नन्नावरे,बबलू शेलार,मा.नगरसेवक सुनिल खोडे,हिंदू एकता आंदोलन चे रामसिंग भाऊ बावरी,राजेंद्र अहिरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायबर सुरक्षेसाठी कठोर कायदे,आधुनिक तपास यंत्रणा आणि जनजागृतीवर भर – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

इमेज
‘टेक-वारी 2.0’ मधून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई दि.७ :- डिजिटल व्यवहारांचा झपाट्याने वाढणारा वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेसाठी आवश्यक धोरणात्मक बदल,कठोर नियम आणि व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचे माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. सायबर गुन्हेगार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करत असून या गुन्हेगारीचे स्वरूप आता पूर्णपणे संघटित आणि ‘कॉर्पोरेट’ पद्धतीचे बनल्याने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक-वारी 2.0 – महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘इव्हॉल्विंग लँडस्केप इन सायबर सिक्युरिटी – थ्रेट्स, चॅलेंजेस अँड ऑपर्च्युनिटीज’ या विषयावरील सत्रात ते बोलत होते.यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की,डिजिटल व्यवहार दिवसेंदिवस वाढत असताना केवळ तांत्रिक सुरक्षा उपाय पुरेसे राहिलेले नाहीत. सुरक...

आंबा व मिलेट (तृणधान्य) महोत्सवाचे शहरात आयोजन - बी सी देशमुख

इमेज
नाशिक दि. 6 मे :-  तृणधान्यांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणाऱ्या नवउद्योजकांना तसेच आंबा उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय,नाशिक यांच्या वतीने ‘आंबा व मिलेट (तृणधान्य) महोत्सव’आयोजित करण्यात आला आहे.‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या संकप्लनेवर आधारीत हा महोत्सव ८ ते १० मे २०२६ या कालावधीत उदोजी महाराज संग्रहालय, आकाशवाणी टॉवरजवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे.नागरीकांनी या महोत्सवास भेट द्यावी,असे आवाहन पणन मंडळाचे विभागीय उपसरव्यवस्थापक एस. वाय.पुरी व विभागीय व्यवस्थापक बी.सी. देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार 8 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. आंबा विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या प्रतीचा आंबा मिळावा तसेच तृणधान्याचे महत्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात 40 स्टॉल्सद्वारे आंबा,मिलेट व त्यापासून बनविलेल...

राज्यातील पशुसंवर्धन विभागात विभागात भरती, हजारो पदांसाठी लवकरच परीक्षा

इमेज
मुंबई :- राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी या पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट ‘अ’च्या २ हजार ७९५ आणि सहायक आयुक्त, पशुसंवर्धन गट ‘अ’च्या ३०८ पदांसाठी संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही परीक्षा ११ जून २०२६ रोजी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे होणार आहे. मंत्री पंकजाताई मुंडे यांचा पशुसंवर्धन विभाग भरती प्रक्रिया बाबत विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे राज्यातील पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकारी रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवा, पशुधन आरोग्य तपासणी, लसीकरण आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक ...

मुख्य टपाल कार्यालयासह पाच ठिकाणीआजपासून समर्पित आधार सेवा केंद्र सुरू

इमेज
नाशिक :- नाशिक विभागातील नागरिकांना आधार नोंदणी व अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागाच्या टपाल खात्यांतर्गत पाच टपाल कार्यालयांमध्ये समर्पित आधार सेवा केंद्रे शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी सुरू करण्यात येणार आहेत.टपाल विभागाचे वरीष्ठ अधीक्षक प्रफुल्ल आर.वाणी यांनी ही माहिती दिली आहे. टपाल कार्यालयांची नावे व त्यांची वेळ अशी : नाशिक मुख्य टपाल कार्यालय,नाशिक रोड मुख्य टपाल कार्यालय- सकाळी १० ते सायंकाळी ५. पंचवटी टपाल कार्यालय, सिडको कॉलनी टपाल कार्यालय- सकाळी ९ ते दुपारी ४, सिन्नर टपाल कार्यालय- सकाळी ८ ते दुपारी ३. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना नवीन आधार नोंदणी,पत्ता बदल,मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे आदी सुविधा उपलब्ध होतील. नागरिकांनी या केंद्रांचा लाभ घ्यावा,असे आवाहन वरीष्ठ अधीक्षक वाणी यांनी केले आहे. 

वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्यासवाहन चालविण्याचा परवाना निलंबित - प्रदीप शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी

इमेज
वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्यास वाहन चालविण्याचा परवाना होऊ शकतो निलंबित   नाशिक :- केंद्रीय मोटार वाहन नियमात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.त्यानुसार एखाद्या वाहन चालकाने एका वर्षात पाच किंवा अधिक वेळेस वाहतूक नियमांचे उल्लंघन केले,तर अशा चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाईल,अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी,नाशिक यांनी दिली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय मोटार वाहन नियमात हे बदल करण्यात आले असून चलन प्रणाली पारदर्शक करण्यात आली आहे. प्रत्यक्ष तसेच इलेक्ट्रॉनिक (ई चलन) पद्धतीने दंड आकारला जाईल. वाहनधारक/वाहन चालकांना चलन भरण्यासाठी किंवा आक्षेप नोंदविण्यासाठी ४५ दिवस मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कोणतीही कार्यवाही न केल्यास चलन स्वीकारले गेले असे मानले जाईल.तसेच पुढील ३० दिवसांत दंड भरणे बंधनकारक राहील. चलनाला आव्हान द्यावयाचे असल्यास संबंधित पुरावे ४५ दिवसांत ऑनलाइन सादर करावे लागतील. आक्षेप नाकारल्यास पुढील ३० दिवसांत ५० टक्के दंड भरुन न्यायालयात अपील करता येईल. चलन न भरल्यास व...

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातीलबचतगटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्थसाहाय

इमेज
नाशिक :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना अनुदानावर ट्रॅक्टरसह साधने खरेदीसाठी अर्थसाहाय देण्यात येते. या योजनेचा पात्र स्वयंसेवी बचत गटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.  योजनेचे स्वरूप असे : या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टिव्हेटर, रोटाव्हेटर व ट्रेलर) यांचा पुरवठा करण्यासाठी साडेतीन लाख रुपयांच्या कमाल मर्यादेत (90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा) खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येईल. पात्रतेचे निकष : 1.स्वयंसहाय्यता बचत गटांचे सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवाशी (Domcile) असावेत.2. स्वयंसहाय्यता बचत गटांतील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. 3. स्वयंसहाय्यता बचत गटांतील अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.4. मिनी ट्रॅक्टर व त्याच्य उपसाधनांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.50 लाख रुपये रा...