पोस्ट्स

About us

नाशिक महापालिका पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची इस्त्रो सफर

इमेज
ऐतिहासिक इस्रो सफर इस्रो दरबारी’हा उपक्रम शहराच्या लौकिकात भर घालणारा हिमगौरी आहेर - आडके मनपा विद्यार्थ्यांची भरारी, इस्रो दरबारी!” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासोबतच शहराच्या लौकिकात भर घालणारा असल्याचे महापौर हिमगौरी आहेर - आडके यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेच्या २६ गुणवंत विद्यार्थ्यांची ऐतिहासिक ‘इस्रो’ विज्ञान सफर विमानाने होणार असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनपा मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाने केले होते.  या कार्यक्रमात बोलतांना महापौर हिमगौरी आहेर - आडके म्हणाल्या की,ज्या नाशिकने देशाला संस्कृतीचे“माहेर घर”आणि उद्योगांची‘यंत्रभूमी’ म्हणून आपली ओळख दिली,त्याच नाशिकचे विद्यार्थी आता अंतराळ विज्ञानाच्या जगात आपली मोहोर उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत.बदलत्या तांत्रिक युगात महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी आणि अवकाश संशोधनासारख्या प्रगत क्षेत्रात आपली ओळख निर्माण करावी,या उदात्त उद्देशाने नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाने आयोजित‘मनपा विद्यार्थ्यांची भरारी,इस्रो दरबारी’हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टा...

वसुंधरा दिनानिमित्त महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते वृक्षारोपण

इमेज
वृक्षलागवड मोहिमेमुळे पर्यावरण संवर्धनास मदत - महापौर  नाशिक :- वसुंधरा दिनी मनपाच्या वतीने वृक्षाची लागवड करून हरित उपक्रमास केलेली सुरुवात ही पर्यावरणाला मदत करणारी ठरणार असल्याचे मनोगत महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी व्यक्त केले.नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने वसुंधरा दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ महापौरांनी केला.या शुभारंभ प्रसंगी बोलताना महापौर हिमगौरी आहेर - आडके यांनी सांगितले की नाशिक शहरात उद्यान व उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने वृक्षाची लागवड हा हाती घेतलेला उपक्रम पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरणार आहे.लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन व संगोपन योग्य रीतीने होईल याची दक्षता आपण सर्वांनी घेऊन हरित नाशिकचा संकल्प करू असे सांगितले.शहरातील प्रत्येक प्रभागात हजार वृक्ष  लागवडीचा संकल्प - उपमहापौर विलास शिंदे  वृक्षांचे जतन, पाणीपुरवठा व देखभाल यासाठी स्वतंत्र नियोजनही करण्यात आले असून शहरातील प्रत्येक प्रभागात हजार वृक्ष लागवडीचा संकल्प असून त्यात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उपमहापौर वि...

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माहितीपुस्तकाचे अनावरण संपन्न

इमेज
नाशिक :- महानगरपालिकेमार्फत शहरातील स्वच्छता व शाश्वत कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी “स्वच्छ भारत अभियान”अंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कचरा वर्गीकरण व घनकचरा व्यवस्थापन अधिनियम याबाबत सविस्तर माहिती देणारे माहितीपुस्तक तयार करण्यात आले आहे. जागतिक वसुंधरा दिन निमित्ताने या माहितीपुस्तकाचे अनावरण महापौर हिमगौरी आडके,उपमहापौर विलास शिंदे तसेच स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या हस्ते करण्यात आले.जनजागृती उपक्रम मनपा आयुक्त मनिषा खत्री तसेच अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला असून सदर माहितीपुस्तक Centre for Science and Environment (सीएसई), नवी दिल्ली या संस्थेमार्फत जनजागृतीकामी उपलब्ध करून देण्यात आले आहे.या माहिती पुस्तकाच्या माध्यमातून नागरिकांना घरगुती तसेच व्यावसायिक स्तरावर ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे,ओल्या कचऱ्यावर स्थानिक पातळीवर कंपोस्टिंग प्रक्रिया राबविणे, तसेच सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर व पुनर्प्रक्रिया करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच कचऱ्याचे योग्य वर...

मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग आढावा बैठक संपन्न

इमेज
नाशिक :- महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्याचा सखोल आढावा घेण्यासाठी दि.२१ रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत जिह्यातील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या विकासासंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीत विशेषतः जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांच्या पटसंख्येत वाढ होण्यावर भर देण्यात आला.येणाऱ्या काळात अधिकाधिक विद्यार्थी या शाळांकडे आकर्षित होतील,यासाठी प्रत्येक शाळेचा सुस्पष्ट आणि दर्जेदार आराखडा तयार करण्याचे आवाहन करण्यात आले.शाळा केवळ इमारतीपुरत्या मर्यादित न राहता त्या सुरक्षित,सुसज्ज आणि सर्व आवश्यक सुविधांनी युक्त असाव्यात,यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे,अशा सुचना मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.शिक्षण हा समाजाच्या विकासाचा पाया असल्याने...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

इमेज
आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य व गुणवत्तापूर्ण करावा                                                             नाशिक :- आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य, आकर्षक व परिणामकारक पद्धतीने राबवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिले.जिल्हा परिषद,नाशिक येथील सभागृहात शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉ.सुभाष बोरसे,शिक्षण उपसंचालक,नाशिक विभाग संजय राठोड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET),नाशिकच्या प्राचार्या रंजना लोहकरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) साईलता सालमेटी, शिक्षणाधिकारी (योजना) सरोज जगताप, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रामचंद्र बोडके तसेच नाशिक व मालेगाव मन...

स्व.अजितदादा यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्राताई यांना खंबीर साथ द्या - मंत्री छगन भुजबळ

इमेज
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या देशभरात सक्षम महिला नेतृत्व म्हणून पुढे येतील - मंत्री छगन भुजबळ बारामती :- देशात अनेक महिला मुख्यमंत्री झाल्या, उपमुख्यमंत्री झाल्या, राष्ट्रपती झाल्या,पंतप्रधान झाल्यात.त्याचप्रमाणे सुनेत्राताई पवार देशातील एक सक्षम महिला नेत्या म्हणून पुढे येतील. त्यामुळे त्यांना केवळ राज्याच्या नाही,तर देशाच्या नेत्या म्हणून निवडून देणार आहात. त्यांच्यात जनतेचे दुःख समजून घेण्याची संवेदनशीलता आहे.त्यांना बारामतीला देशाच्या नकाशावर एका नव्या उंचीवर न्यायचे आहे.त्यामुळे आपण सर्वांनी मतदान करणे महत्त्वाचे असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या अधिकृत उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभा आज बारामती येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,मंत्री उदय सा...

संकटकाळात मदतीचा हात! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरतोय रुग्णांसाठी 'जीवनदायी'

इमेज
मुंबई, दि. १७:- शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात आर्थिक वर्षात ८६९ रुग्णांना सुमारे ८ कोटी १० लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राऊड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दात्यांचे सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे. २० गंभीर आजारासाठी मदत कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बा...