जलसंधारण विभागाची कामे मुदतीत पुर्ण करावीत - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
नाशिक :- मृद व जलसंधारण विभागांतर्गत विविध योजनांची कामे प्रशासनामार्फत राबविली जातात. या योजना जलसाठा वाढविण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठीही महत्त्वाच्या आहे. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून योजनेचे उद्दिष्ट मुदतीत साध्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते.यावेळी उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे,जिल्हा जलसंधारण अधिकारी रा.हि.झुरावत,वरिष्ठ भूवैज्ञानिक किरण कांबळे, तंत्र अधिकारी विजय चौधरी,उपविभागीय जलसंधारण अधिकारी राजीव शिंदे,सचिन खंबाईत,जिल्हा जल संधारण अधिकारी (जिल्हा परिषद) रघुनाथ गवळी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ दीपक लोणे, सहाय्यक वनसंरक्षक (पश्चिम) प्रशांत खैरनार, सहाय्यक वनसंरक्षक (पूर्व) शिवाजी सहाणे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की,‘जलयुक्त शिवार 2.0’ अंतर्गत गावनिहाय जलसंधारणाची कामे प्राधान्य...