पोस्ट्स

About us

नाशिक ते मध्य प्रदेश असा रंगणार जलप्रवास; मुख्यमंत्र्यांनी केली 'या' मोठ्या उपक्रमाची घोषणा!

इमेज
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त आयोजन मुंबई,दि.१३ :-“गोदा ते नर्मदा” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य,विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी २५ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. गोदा ते नर्मदा या जलयात्रेबाबत मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा,जलसंपदा लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे,जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींची जन्मभूमी चोंडी महाराष्ट्रात असून त्यांचा प्रभावी सांस्कृतिक वारस...

अण्णासाहेब आर्थिक मागास महामंडळाचा‘व्यवसाय वर्धन मार्केटिंग टॅब’ ‍फ्लिपकार्ट,ॲमेझॉन आणि इंडिया मार्ट यांच्या धर्तीवर तयार

इमेज
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम वेगात लघुउद्योजकांना ‘लोकल ते ग्लोबल’ची दिशा मुंबई, दि. १३ :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.या उद्देशाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम, मार्केटिंग टॅब सारख्या आधुनिक सुविधा आणि कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक सुधारणा राबवून व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ दिले जात आहे.या उपक्रमांद्वारे लाभार्थ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे,तर ज्ञान,कौशल्ये आणि बाजारपेठेची जोड देऊन त्यांना सक्षम उद्योजक बनविण्याचा प्रयत्न महामंडळाद्वारे करण्यात येत आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे. डिजिटल बाजारपेठेची दारे उघडली महामंडळाने आपल्या अधिकृत पोर्टलवर ‘व्यवसाय वर्धन मार्केटिंग टॅब’विकसित केला असून तो ‍फ्लिपकार्ट,ॲमेझॉन आणि इंडिया मार्ट यांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे.या प्लॅटफॉर्मवर लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची ...

"फाटलेला कोट घातलेल्या त्या मुलाने करोडपती माणसाला काय धडा दिला? नक्की वाचा!"

इमेज
"किंमत फाटलेल्या कोटाची नाही,तर काळजाची असते!" एक खूप मोठे उद्योगपती आपल्या आलिशान कारमधून जात होते.अचानक एका सिग्नलवर एक १०-१२ वर्षांचा मुलगा त्यांच्या कारची काच ठोठावू लागला.त्याच्या अंगावर एक फाटलेला जुना कोट होता आणि डोळ्यांत एक वेगळीच चमक होती.त्या उद्योगपतीने काच खाली केली आणि रागाने विचारले,"काय हवंय तुला? पैसे हवेत?"तो मुलगा हसून म्हणाला,"नाही साहेब,मला पैसे नकोत.मी फुलं विकतोय.आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि मला तिला एक छोटी भेट घ्यायची आहे. तुम्ही ही फुलं विकत घेतली तर मला खूप मदत होईल."त्या माणसाला मुलाचे बोलणे ऐकून नवल वाटले.त्याने विचारले,"तुझा कोट तर फाटलेला आहे,तू आधी स्वतःसाठी नवीन कपडे का घेत नाहीस?" मुलाने दिलेले उत्तर त्या श्रीमंत माणसाच्या काळजाला स्पर्श करून गेले.मुलगा म्हणाला, "साहेब,कपडे फाटलेले असले तरी चालतात,पण माणसाचं मन फाटलेलं नसावं.माझा कोट बाहेरून फाटलाय,पण आतून माझी स्वप्नं शाबूत आहेत!"त्या उद्योगपतीने सर्व फुलं विकत घेतली आणि मुलाला ५०० रुपये जास्तीचे देऊ केले.पण त्या मुलाने ते जास्तीचे पैसे घ...

"आरशात दिसलं असं काही की अंगावर काटा येईल!"

इमेज
"ती तिसरी व्यक्ती कोण?" भाग १: मध्यरात्रीचा तो फोन रात्रीचे ठीक १२ वाजले होते. सयाजीराव आपल्या आलिशान बंगल्यात एकटेच फाईल्स तपासत बसले होते. अचानक त्यांचा फोन खणखणला. अनोळखी नंबर होता. फोन उचलला तर पलीकडून फक्त श्वासांचा आवाज येत होता. "कोण आहे?" सयाजीरावांनी विचारलं. पलीकडून एक करड्या आवाजात उत्तर आलं, "सयाजीराव, आजची रात्र तुमची शेवटची रात्र आहे. बरोबर २ वाजता काळोख येईल आणि खेळ संपेल!" भाग २: बंद दारे आणि सावली सयाजीरावांनी तातडीने सुरक्षा रक्षकाला आवाज दिला, पण बाहेरून काहीच उत्तर आलं नाही. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला, तर धक्काच बसला! कॅमेऱ्याच्या लेन्सवर कोणीतरी काळं कापड बांधलं होतं. घराचे सर्व दरवाजे आतून लॉक होते, खिडक्या बंद होत्या. मग हा धमकी देणारा माणूस आत आला कसा? अचानक घराचा वीजपुरवठा खंडित झाला. संपूर्ण बंगल्यात भयाण शांतता पसरली. भाग ३: आरशातलं रहस्य सयाजीरावांनी हातात मेणबत्ती घेतली. ते हॉलमधील मोठ्या आरशासमोरून जात असताना त्यांना आरशात स्वतःच्या मागे एक तिसरी सावली दिसली. त्यांनी मागे वळून पाहिलं, तर तिथे कोणीच नव्हतं! ...

सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा ज्योतिराव फुले - विशेष लेख

इमेज
भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता,शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो.११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे. समाजातील समता, शिक्षण,स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे. मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार महात्मा फुले यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिंदू ...

मनपाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

इमेज
नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई नाका,सावित्रीबाई फुले चौक,फुले स्मारक येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास तसेच मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले मुंबई नाका,सावित्रीबाई फुले चौक,फुले स्मारक येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले,यांच्या पुतळ्यास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन,महापौर हिमगौरी आहेर आडके,खासदार राजाभाऊ वाजे,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,गटनेते अजय बोरस्ते,गटनेते केशव पोरजे,यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.यावेळी नाशिक महापालिका नगरसेवक,नगरसेविका  पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर आडके,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,नगरसेवक सुरेश पाटील,नगरसेविका कोमल मेहरोलिया यांनी पुष्पहार अर्पण केले.यावेळी कार्यक्र...

महिलांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
खानवडीत ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पुणे, दि. ११ :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून तो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्त्री-शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून त्यांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांचे मुळगाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेल्या ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे’उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,शिक्षण मंत्री दादाजी भुसे,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक मंत्री अतुल सावे,कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे,शिक्षण राज्यमंत्री योगेश कदम आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले या...