पोस्ट्स

About us

वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. ‘मित्रा’ आणि ‘अर्थ डे नेटवर्क’मध्ये ५६ लाख झाडांचा करार!

इमेज
मुंबई  दि.१८:-  महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक सल्लागार संस्था असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात ‘मित्रा’ (MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यामध्ये पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारांतर्गत ५६ लाख वृक्ष रोपणासह विविध उपक्रम राबवून  राज्यातील हवामान कृतीला (Climate Action) गती देण्यात येणार आहे. जागतिक वसुंधरा दिन २०२६ च्या निमित्ताने करण्यात आलेला हा सामंजस्य करार शाश्वत विकासाची चौकट मजबूत करण्यासाठी तसेच नागरिक, संस्था आणि उद्योगांना हरित भविष्यासाठी एकत्र आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या भागीदारीत ‘मित्रा’ संस्थेकडून धोरणात्मक मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ दिले जाणार असून, अर्थ डे नेटवर्क इंडिया ही संस्था प्रत्यक्ष अंमलबजावणी, जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. या सहकार्याअंतर्गत महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार मिशन लाईफ : नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी राज्यव्यापी आराखडा सरकारी ऊर्जा ऑडिट चॅलेंज: ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि ...

अग्निशमन विभागाच्या वतीने जनजागृती रॅली आयोजन शहीदांना श्रद्धांजली

इमेज
नाशिक :- मनपाच्या वतीने अग्निशमन व आपत्कालीन सेवा सप्ताह २०२६ निमित्त सोमवार दि.२० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता अग्निशमन विभागाच्या वतीने नाशिक शहरातून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.दि.१४ एप्रील १९४४ रोजी मुंबई मधील गोदीत एस. एस. पोर्ट स्टिकीन या जहाजाला स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीशी झुंझ देतांना मुंबई व इतर अग्निशमन दलाचे ६६ जवान हुतात्मा झाले.तसेच त्यानंतरही अग्निशमनाचे कार्य करतांना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी श्रध्दांजली वाहून जनतेमध्ये अग्निशमन बाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रतीवर्षी केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार सपूर्ण देशात दि.१४ ते दि. २० एप्रिल या कालावधीत "अग्निशमन सेवा सप्ताह" पाळला जातो. शहीद जवानांना श्रध्दांजली या अनुशंगाने नाशिक महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाकडून दिनांक १४ एप्रिल रोजी पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्र येथे शहीद जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.त्यामध्ये नाशिक महानगरपालिका अग्निशमन व आपत...

सुपर सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार

इमेज
मुंबई, दि. १७ :- बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांना भावनिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी ‘मासूम’ प्रकल्प राबविण्यात येतो.येथील अनेक मुलांना त्याग,आघात,शोषण किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो.अशा मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा ओळखून त्यांना योग्य वेळी सहाय्य मिळावे,या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने ‘मासूम’प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार करण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभाग आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या ‘ईमपॉवर’ उपक्रम यांच्यातील परस्पर सामंजस्य करारातून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत प्रकल्पांतर्गत २० संस्थांमधील १,८६१ मुलांना लाभ मिळाला असून ५,००० हून अधिक समुपदेशन सत्रे घेण्यात आली आहेत.मानकीकृत मूल्यांकन साधनांच्या आधारे मुलांच्या भावनिक स्थैर्यात आणि सामाजिक वर्तनात लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच पालक व पालक प्रतिनिधींनाही समुपदेशन देऊन कुटुंबीय नातेसंबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.फेब्रुवारी २०२३ मध्ये सामंजस्य कराराद्वारे या प्रकल...

नियम पाळला नाही तर शाळांची मान्यता थेट रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

इमेज
मराठी भाषा सक्ती : नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर दंड व मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया निश्चित मुंबई,दि.१७ :- राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची असतानाही नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.यासाठी शालेय शिक्षण विभागाने सविस्तर कार्यपद्धती निश्चित केली असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.राज्यात मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी २०२० मध्ये अधिनियम लागू करण्यात आला आहे.त्यानुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात आला आहे.तथापि,काही विशेषतःइंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये या तरतुदींचे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.या पार्श्वभूमीवर सर्व शाळांनी मराठी विषयासाठी पात्र शिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकारक राहील. तसेच,मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत आहे की नाही याची तपासणी शिक्षण उपसंचालक,शिक्षणाधिकारी व निरीक्षक यांच्या पथकांमार्फत केली जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या श...

वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

इमेज
दिंडोरी :- जि.प.शाळा,तळेगाव येथे शालेय साहित्याचे दि.17 एप्रिल 2026 रोजी जि.प.शाळा,तळेगाव, ता.दिंडोरी येथे राहुल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तुला केलेल्या वह्यांचे वाटप डी एस एफ यांचे वतीने करण्यात आले.सरपंच सोनाली चारोस्कर,अशोक दुधारे,अशोक कदम, दीपक निकम,ज्योती निकम,अविनाश ढोली,विजया दुधारे,माजी सरपंच अजय चारोस्कर,यांचे हस्ते 160 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या विविध झाडांच्या बियांचे संकलन करण्यात आले.जमा केलेल्या बियांचे रोपण करण्यात येणार आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कांतीलाल भरसट, शाळेतील शिक्षक धनंजय आहेर,अशोक देवरे,पुष्पा जगताप,कुंदा निकम,माधुरी थोरात,ज्योती अहिरे,पल्लवी गांगोडे,रोहिणी परदेशी यांनी परिश्रम घेतले.

बालविवाह होत असल्यास तात्काळ माहिती द्यावी कायदेशीर कारवाईचे निर्देश

इमेज
अक्षयतृतीया निमित्त बालविवाह रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाशिक :- अक्षयतृतीया या दिवशी जिल्ह्यात सामूहिक बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून तात्काळ कार्यवाही करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ तसेच महाराष्ट्र राज्यातील सुधारित नियम २०२२ नुसार बालविवाह हा दंडनीय गुन्हा आहे.बालिकेचे वय १८ वर्षांखालील किंवा बालकाचे वय २१ वर्षांखालील असल्यास विवाह केल्यास संबंधितांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजूरीची कैद किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.ग्रामीण भागात ग्रामपंचायत अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून अंगणवाडी सेविका सहाय्यक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.तसेच शहरी भागात सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका (नागरी) यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.या सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून संभाव्य बालविवाहांच्या घटनांवर लक्ष ठेवावे.बालवि...

कळवण नांदुरी रोड अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी गुन्हा दाखल

इमेज
कळवण :- दि.15/04/2026 रोजी कळवण ते नांदुरी जाणारे रोडवर गोबापुर शिवार विट भट्टी जवळ ठिकाणी,यातील सागर मगनलाल गांगुर्डे राहणार आंबे,आरोपीताने त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची मॅक्सिमो गाडी (क्र. MH-41 AM-0733) ही कळवण बाजूकडून नांदुरी बाजूकडे चालवत नेत असताना, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्याने ही गाडी हयगयीने, अविचारीपणे आणि भरधाव वेगात चालवून समोरून जाणाऱ्या मालवाहू कंटेनरला (क्र. MH-43 BP-2740) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी समोरून (नांदुरी बाजूकडून कळवण बाजूकडे) येणारी फिर्यादी किसन बबन चौरे रा दहेगाव मनमाड यांचा चुलत भाऊ मयत गणेश वाल्मिक चौरे (रा. भुषणी, ता. कळवण) यांच्या मोटारसायकलला (क्र. MH-41 AJ-1759) डाव्या बाजूने जोराची धडक दिली.यामधे गाडीचे मोठे नुकसान तसेच जीवितहानी या भीषण अपघातात मोटारसायकल स्वार गणेश वाल्मिक चौरे यांच्या डोक्याला, तोंडाला आणि मानेला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली त्यांची बहीण दीपाली वाल्मिक चौरे,आणि मित्र पार्थ महिपत साबळे (दोघे रा. भुषणी, ता. कळवण) हे दोघेही गंभीर जखमी झाले...