पोस्ट्स

About us

चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन - मंत्री आशिष शेलार

इमेज
राज्यात नवीन फिल्म सिटी, सिंगल विंडो क्लिअरन्स आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांवर भर मुंबई, दि. ११ : राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी तीन तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. या समितीने देशातील विविध राज्ये तसेच परदेशातील चित्रपट उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून तीन महिन्यांत अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये चित्रपट निर्मितीदरम्यान येणाऱ्या अडचणी, चित्रीकरणासाठी आवश्यक सुविधा, परवानग्या तसेच उद्योगवृद्धीसाठी आवश्यक धोरणात्मक बदल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत ...

मनपा प्रशासनाने बैठक आयोजित करून ऐनवेळी रद्द केल्याने प्रहार दिव्यांग संघटना पदाधिकारी संतप्त

इमेज
मनपा प्रशासनाने बैठक आयोजित करून ऐनवेळी रद्द केल्याने प्रहार दिव्यांग संघटना पदाधिकारी संतप्त विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- शहरातील दिव्यांगांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासंदर्भात तसेच राखीव आणि निधी खर्च करण्यासंदर्भात प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना पत्र देण्यात आले होते त्या पत्रास अनुसरून नाशिक महानगरपालिकेने दिनांक 11 मे रोजी अकरा वाजता बैठक आयोजित केली असल्याचे लेखी पत्र पाठवून बैठकीस आमंत्रित केले होते. जेव्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी राजीव गांधी भवन मुख्यालय येथे आले असता बैठक रद्द झाल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले तसेच अतिरिक्त आयुक्त व मनपा उपायुक्त समाज कल्याण हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिला आयोगाच्या बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले दिव्यांग संघटनेची बैठक ही पूर्वनियोजित असतानाही मनपा अधिकारी हे हजर नसल्याने दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मनपा दिव्यांग निधी मधून दिव्यांगांना दरमहा 3000 ऐवजी 6000 रुपये अनुदान देण्यात यावे तसेच राखीव दिव्यांग निधी इतरत...

कुंभमेळासाठी व्यापक आरोग्य यंत्रणा उभारणार अतिदक्षता कक्ष तातडीची आरोग्य सेवा

इमेज
सिंहस्थ २०२७ साठी व्यापक आरोग्य यंत्रणा उभारणार; सर्व घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष, नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये वाढविणार खाट क्षमता नाशिक,दि.९ :- सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान भाविकांना तातडीची आणि सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने व्यापक आरोग्य आराखडा तयार केला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी रुग्णालयांची वाढीव क्षमता, घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष,विविध भागांत ओपीडी सेवा तसेच ‘रिले सिस्टीम’वर आधारित रुग्णवाहिका व्यवस्था उभारण्यात येणार आहे. नाशिक शहरातील एकूण खाट क्षमता १ हजार ३०५ वरून १ हजार ९४५ पर्यंत वाढविण्यात येणार असून त्यात १८५ आयसीयू खाटांचा समावेश असेल. तात्पुरत्या आरोग्य सुविधांद्वारे ६४० अतिरिक्त खाटा उभारण्यात येणार आहेत. तपोवन येथे १०० खाटांचे रुग्णालय तसेच नांदूर (साधुग्राम) येथे १० खाटांची सुविधा उभारण्यात येणार आहे. शहरातील सर्व १३ घाटांच्या दोन्ही बाजूंना तात्पुरते अतिदक्षता कक्ष कार्यान्वित केले जाणार असून २१ ठिकाणी ओपीडी सेवा आणि १९ ठिकाणी रुग्णालये व वैद्यकीय युनिट्स उभारली जाणार आहेत.पा...

नाशिक द्वारका,सारडा सर्कल परिसरातील पक्के बांधकाम पत्र्याचे अतिक्रमण हटविले

इमेज
नाशिक :- अतिक्रमण पथकाने सारडा सर्कल ते द्वारका व चित्रकूट परिसरात ५० अतिक्रमणे हटविली नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने सारडा सर्कल ते द्वारका व चित्रकूट परिसरात शनिवारी पहाटे धडक अतिक्रमण मोहीम राबवून या अतिक्रमण मोहिमेत सुमारे ५० दुकाने हटविली.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते मोकळे करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचे मार्गदर्शनाखाली,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांचे निर्देशानुसार व पोलिस प्रशासनाच्या मदतीने सारडा सर्कल ते द्वारका व चित्रकूट परिसरात ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्या सह पोलीस विभागाचे अधिकारी,मनपाचे विभागीय अधिकारी व मनपा कर्मचारी यांचे उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.मोहिमेत ५० अतिक्रमणे हटविली. सारडा सर्कल ते द्वारका व चित्रकूट परिसरात ही अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत पक्क्या स्वरूपाचे बांधकाम व पत्र्याचे शेड असे एकूण ५० अतिक्रमणे या मोहिमेत हटविण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण विभ...

नाशिक मधील सिद्धेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न

इमेज
नाशिक :-जुने नाशिक येथील श्री स्वयंभू सिद्धेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.​या मंगलप्रसंगी महारष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली. उपस्थित सर्व भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भगवान महादेवांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. जुने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवचैतन्य देणारा हा सोहळा भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ​या सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.देवयानी फरांदे आमदार विक्रांत पाटील भारतीय जनता पक्ष शहराध्यक्ष सुनील केदार,गटनेते शाम बडोदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार,नगरसेवक चंद्रकांत खोडे,नगरसेविका स्वाती भामरे,नगरसेविका रुपाली निकुळे,सचिन मराठे,मंगला नन्नावरे,बबलू शेलार,मा.नगरसेवक सुनिल खोडे,हिंदू एकता आंदोलन चे रामसिंग भाऊ बावरी,राजेंद्र अहिरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायबर सुरक्षेसाठी कठोर कायदे,आधुनिक तपास यंत्रणा आणि जनजागृतीवर भर – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

इमेज
‘टेक-वारी 2.0’ मधून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई दि.७ :- डिजिटल व्यवहारांचा झपाट्याने वाढणारा वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेसाठी आवश्यक धोरणात्मक बदल,कठोर नियम आणि व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचे माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. सायबर गुन्हेगार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करत असून या गुन्हेगारीचे स्वरूप आता पूर्णपणे संघटित आणि ‘कॉर्पोरेट’ पद्धतीचे बनल्याने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक-वारी 2.0 – महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘इव्हॉल्विंग लँडस्केप इन सायबर सिक्युरिटी – थ्रेट्स, चॅलेंजेस अँड ऑपर्च्युनिटीज’ या विषयावरील सत्रात ते बोलत होते.यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की,डिजिटल व्यवहार दिवसेंदिवस वाढत असताना केवळ तांत्रिक सुरक्षा उपाय पुरेसे राहिलेले नाहीत. सुरक...

आंबा व मिलेट (तृणधान्य) महोत्सवाचे शहरात आयोजन - बी सी देशमुख

इमेज
नाशिक दि. 6 मे :-  तृणधान्यांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणाऱ्या नवउद्योजकांना तसेच आंबा उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय,नाशिक यांच्या वतीने ‘आंबा व मिलेट (तृणधान्य) महोत्सव’आयोजित करण्यात आला आहे.‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या संकप्लनेवर आधारीत हा महोत्सव ८ ते १० मे २०२६ या कालावधीत उदोजी महाराज संग्रहालय, आकाशवाणी टॉवरजवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे.नागरीकांनी या महोत्सवास भेट द्यावी,असे आवाहन पणन मंडळाचे विभागीय उपसरव्यवस्थापक एस. वाय.पुरी व विभागीय व्यवस्थापक बी.सी. देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार 8 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. आंबा विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या प्रतीचा आंबा मिळावा तसेच तृणधान्याचे महत्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात 40 स्टॉल्सद्वारे आंबा,मिलेट व त्यापासून बनविलेल...