सायबर सुरक्षेसाठी कठोर कायदे,आधुनिक तपास यंत्रणा आणि जनजागृतीवर भर – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
‘टेक-वारी 2.0’ मधून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई दि.७ :- डिजिटल व्यवहारांचा झपाट्याने वाढणारा वापर आणि त्यासोबत वाढणाऱ्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेसाठी आवश्यक धोरणात्मक बदल,कठोर नियम आणि व्यापक जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचे माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. सायबर गुन्हेगार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना लक्ष्य करत असून या गुन्हेगारीचे स्वरूप आता पूर्णपणे संघटित आणि ‘कॉर्पोरेट’ पद्धतीचे बनल्याने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक-वारी 2.0 – महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘इव्हॉल्विंग लँडस्केप इन सायबर सिक्युरिटी – थ्रेट्स, चॅलेंजेस अँड ऑपर्च्युनिटीज’ या विषयावरील सत्रात ते बोलत होते.यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की,डिजिटल व्यवहार दिवसेंदिवस वाढत असताना केवळ तांत्रिक सुरक्षा उपाय पुरेसे राहिलेले नाहीत. सुरक...